मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केवळ संस्कृत भाषेमुळे भविष्यात बोलते संगणक प्रत्यक्षात येतील. कारण संस्कृत हीच अशी एक वैज्ञानिक भाषा आहे. असे नासाच्या वैज्ञानिकांनी मान्य केले होते. असा दावा मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला आहे. शनिवारी ते आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
ते म्हणाले की, नासानुसार पुढील काळात जर बोलते संगणक बनले तर ते केवळ संस्कृत भाषेमुळेच शक्य होईल. नासा हे म्हणते कारण संस्कृत हीच एक अशी भाषा आहे. जिच्यामध्ये जसे बोलले जाते तसेच शब्द लिहिले जातात.
चरक ऋषींनी आयुर्वेदात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. अणू आणि मॉलीक्यूलचा शोध करणारे ते पहिले व्यक्ती होते. एटम आणि मॉलिक्यूलबाबत पहिला शोध कोणी केला ? तर तो चरक ऋषिंनी. त्यांनीच एटम आणि मॉलिक्युल शोधून काढले. तर प्राचीन काळी चिकित्सक सुश्रृत जगातील पहिले सर्जन होते. असा दावा त्यांनी केला.