मुंबई : बहुजननामा ऑनलाइन :- भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी ही सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांचा असणारा सवर्णांच्या आरक्षणाचा विरोध म्हणजे संविधानाला विरोध आहे. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी ही सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांचा असणारा सवर्णांच्या आरक्षणाचा विरोध म्हणजे संविधानाला विरोध आहे. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर सगळेच सवर्ण श्रीमंत नाहीत. मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सवर्णांना आरक्षण देण्याची मी सर्वप्रथम मागणी केली होती.
माझी मागणी केंद्र सरकारने आता मान्य केली आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांचा याला विरोध चुकीचा आहे. असेही ते म्हंटले. याचबरोबर रिपब्लिकन पक्षामध्ये ऐक्य झाले तरी फार फायदा होणार नाही. जनतेची आघाडी महत्वाची आहे. मात्र, खरोखर ऐक्य होणार असेल तर मी मंत्रीपदासकट भाजप सोडील.
भारिप नेते प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांचा असणारा सवर्णांच्या आरक्षणाचा विरोध म्हणजे संविधानाला विरोध आहे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मध्य मुंबईची लोकसभा जागा मलाच हवी आहे. शिवसेना युतीमध्ये सहभागी झाली नाही तरी मी जिंकून येईल. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, शिवसेना- भाजपा अंतर्गत वाद वाढत असला तरी लोकसभेला अंतिम टप्प्यात युती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युती नाही झाली तरी रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत जाईल. यामुळे रिपाईला ४ लोकसभेच्या जागा मिळतील आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला पुन्हा संधी मिळेल. असेही ते म्हंटले.