मुंबई : बहुजननामा ऑलनाइन – भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु असतानाच युतीच्या मित्र पक्षांनी देखील जागा मागण्यास सुरुवात केली आहे. आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत युतीला 240 जागा मिळतील असा दावा करून त्यांनी आपल्या पक्षासाठी 10 जागांची मागणी केली आहे. दरम्यान, युतीच्या जागा वाटपाच पेच येत्या गुरुवारी (दि.19) मिटेल असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Ramdas Athawale, Republican Party of India (RPI) on seat-sharing for Maharashtra Assembly elections: We have demanded 10 seats, RPI will stay with BJP and Shiv Sena and secure at least 240 seats together. pic.twitter.com/mu6WosXr5I
— ANI (@ANI) September 15, 2019
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजयकीय घडामोडींवर आरपीआयचे पत्ते खुले केले आहेत. आम्ही राज्यातील विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा-शिवसेनेच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. युतीला 288 पैकी 240 जागा मिळतील. यामुळे आम्हाला 10 जागा हव्या असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता असून याच दरम्यान आचारसंहिताही लागू होण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपांबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेला 120 तर भाजपला 160 जागा मिळण्याचे आकडे समोर येत आहेत. मात्र, मित्रपक्षांनी जादा जागांची मागणी केल्याने भाजपसमोर पेच निर्माण होण्याच शक्याता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी-युतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. तर वंचित बहुजन आणि एमआयएम यांच्यामधील बोलणी फिस्कटल्याने तिसरी आघाडी फुटली आहे. या आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याचा थेट फायदा भाजप-शिवसेना युतीला झाला होता.