संगमनेर: बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसे कडून मोठा मेळावा करण्यात आला होता. यावेळी पक्षाचा झेंडा देखील बदलण्यात आला आता त्याबाबत रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साल्ला दिला आहे. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा आठवले म्हणाले. भाजपने मनसे बरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपला दिला आहे. संगमनेर येथे पत्रकार परिषदेत बोल्त होते.
उद्धव ठाकरेंनी शब्द पाळावा
यावेळी बोलताना आठवले म्हणाले , रामदास आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असुन पाकने तो भाग भारताला द्यावा. युद्ध न करता पाकने पुढाकार घेत जर पाकव्याप्त काश्मीर दिला तर योग्यच नाही तर युद्ध करून तो भाग भारताने काबीज करावा, अशी आमची भूमिका असल्याच आठवले यांनी यावेळी सांगितले.
झेंडा बदलला हिंदू मतांसाठी ते भूमिकादेखील बदलतील
‘मनसेनं झेंडा बदलला आहे. हिंदू मतांसाठी ते भूमिकादेखील बदलतील. मात्र खरा हिंदुत्ववादी कोण ते जनता ओळखून आहे. त्यामुळे जनता यांच्या जाळ्यात फसणार नाही आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही,’ असा विश्वास भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केला आहे.