मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राखी सावंत आणि वादाचा जवळचा संबंध आहे. सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणारी राखी सावंत तिच्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत येत असते. राखीच्या नव्या सोशल मीडिया पोस्टने तिच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेहमी बोल्ड आणि बिंदास राहणाऱ्या राखी सावंतने सोशल मीडिया अकाउंटवर अनेक व्हिडीओ पोस्ट केल्या आहेत. प्रत्येक व्हिडीओमध्ये राखी नाराज दिसते आहे.
राखीने एक ब्लॅक ऍण्ड व्हाईट व्हिडीओ शेयर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये गाणं चालू आहे- अभी तुमको मेरी जरूरत नहीं, बहुत चाहने वाले मिल जाएंगे.
तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये राखी रडतांना दिसते आहे. राखीच्या व्हिडीओ मध्ये गाणं चालू आहे- सच है कि दिल तो दुखा, हमने मगर सोचा है. एका व्हिडीओमधील डायलॉग्स वर ती खूप उदास आणि दु:खी हावभाव करतांना दिसते आहे.
डायलॉग्स आहे- इंतजार करते करते एक और शाम बीत गई, तुम आज भी नहीं आओगे और तन्हाई फिर जीत जाएगी. राखीचे हे उदास व्हिडीओ बघून यूजर्सला वाटते आहे की, तिचे तिचा पती रितेशसोबत भांडण झाले आहेत. तिच्या व्हिडीओला लोक कमेंट करत तिला विचारता आहेत की, तुझे तुझा पती रितेश सोबत भांडण झाले का.
एका यूजर्सने लिहिले की, ‘क्या रितेश ने छोड़ दिया है क्या?’
तर काही यूजर्स राखीला व्हिडीओवर कमेंट करत म्हणता आहे की, रितेशसोबत घटस्फोट झाला का ?
आणखी काही यूजर्स विचारता आहे की, रितेशने सोडून दिले की, धोका दिला ?
एका यूजर्सने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ‘क्या आपके पति ने आपको डाइवोर्स दे दिया है.’
२८ जुलै ला राखी सावंत ने मुंबईच्या JW Marriott मध्ये गुपचूप लग्न केले होते. सुरुवातीला राखीने या गुप्त लग्नाचे वर्णन ब्राइडल फोटोशूट केले होते, परंतु नंतर एनआरआय व्यावसायिकाशी लग्न केल्याच्या खुलास्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.