पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे नाट्य सुरु झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले कि, महाराष्ट्रात दुष्काळ असताना पाण्यावरुन राजकारण करणे दुर्देवी आहे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचे काय करायचे असा सवाल करत पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते.
पुढे बोलताना म्हणाले की , पाण्यावर शेतकऱ्याचा, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप झालं की नाही, हे तपासून बघावे लागले. परंतु ज्याच्या त्याच्या वाट्याचं पाणी त्याला मिळायला हवं. जर ते मिळालं नसेल तर बारामतीच्या पाण्याचा मुद्दा आत्ताच का काढला जाताे ? असा प्रश्न निर्माण हाेताे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचं काय करायचं असा प्रश्न निर्माण हाेताे . बारामतीला देण्यात आलेलं पाणी हे त्यांच्या काेट्यापेक्षा जास्त आहे की नाही. याबाबत मला कल्पना नाही, परंतु जास्त असेल तर आत्तापर्यंत सरकारने का डाेळेझाक केली ? आणि नसेल तर अचानक बंद करण्याचे कारण काय ? पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना याची किंमत माेजावी लागेल.