बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यपाल (Governor) महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त 12 आमदारांच्या (MLA) पत्रावर (letter) स्वाक्षरी (Signature) करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकारने (State Government) विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या 12 सदस्यांची यादी दिली आहे. यामध्ये राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे नाव असल्याची चर्चा आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून यादी राज्यपालांकडे पडून आहे. त्यावर अद्याप राज्यपालांनी (Governor) स्वाक्षरी केली नाही. यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्यपालांवर टीका केली. Raju Shetti | there no time sign letter 12 mlas appointed governor legislative council raju shettys harsh word
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपने मला शहाणपणा शिकवू नये
राजू शेट्टी आज पुण्यात (Raju Shetti Visit Pune) आले होते. त्यांनी साखर आयुक्तांबरोबर (Sugar Commissioner) भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) देखील टीका केली. ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात या भाजपच्या टिकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते (All BJP leaders) कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात (caste) काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दात राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाजपवर (Bjp) निशाणा साधला.
निती आयोगाची (NITI Aayog) शिफारस मान्य नाही
निती आयोगाने (NITI Aayog) शेतकऱ्यांना ऊसाची किंमत तीन हप्त्यात द्यावी अशी शिफारस केली ती मान्य नाही. वेळ पडल्यास याविरोधात न्यायालयातही (Court) जाऊ. याविषयासंदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु आहे. यात राजकारणाचा काहीही संबंध नसल्याचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी यावेळी सांगितले.
Web Titel : raju shetti there no time sign letter 12 mlas appointed governor legislative council raju shettys harsh word
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत