बहुजननामा ऑनलाईन – सुपरस्टार रजनीकांत यांची भारतीय राजकारणावर बारीक नजर असते प्रसंगी ते त्याबद्दल आपले मतही व्यक्त करतात. कलम ३७० च्या निर्णयावर त्यांनी अलीकडेच चेन्नई येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. त्यांनी पीएम मोदी यांचे वर्णन कृष्णा आणि अर्जुनची जोडी म्हणून केले. कलम ३७० च्या निर्णयामुळे ते पंतप्रधान मोदी आणि शहा यांचे चाहते बनले आहेत.
रजनीकांत म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविणे हा एक चांगला निर्णय आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे यासाठी मी अभिनंदन करतो. आता लोक अमित शहा यांचे सामर्थ्य समजून घेतील. अमित शहाजी आणि मोदीजी कृष्णा आणि अर्जुन यांच्या जोडीसारखे आहेत.” रजनीकांत हे “Listening, Learning and Leading” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या पुस्तकात मागील २ वर्षात देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित राज्यांतील उपराष्ट्रपतींच्या ३३० सार्वजनिक कार्यक्रमांच्या काही झलक आहेत.
या पुस्तकात नायडूंच्या ४ खंडांच्या १९ देशांच्या भेटींसह प्रमुख राजनैतिक परिषदांचा उल्लेख आहे. याव्यतिरिक्त, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कर्तृत्व आणि उपक्रमांचा उल्लेख या पुस्तकात आहे.