नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Rajesh Tope | महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona) दुस-या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) सर्व व्यवहार सुरू केले आहे. दरम्यान अनेक व्यवहार सुरू करण्याला सरकारने कोरोनाचे नियमने पाळण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात तिसरी लाट (corona 3rd wave) येण्याची शक्यता फारच कमी असली तरी दुसरी लाट (Covid-19 2nd wave) अद्याप ओसरलेली नाही.
याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. त्यावेळी टोपे हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राजेश टोपे (Rajesh Tope) बोलताना म्हणाले की, तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी असली तरी दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाहीत तर दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. असं टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘सध्या कोठेही तिस-या लाटेची सुरुवात नाही. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. असं ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पॉझिटिव्हीटी दर (Positivity rate) कमी झालेला आहे. मात्र कोरोना चाचणी देखील कमी केलेल्या नाहीत. कोरोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता कमी झाली आहे. कोरोनामुळे मुंबईत एकाचाही मृत्यू झालेला नाही. हा लसीकरणाचा फायदा आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे. अशी माहिती राजेश टोपे (NCP Leader Rajesh Tope) यांनी दिली आहे.
web title: Rajesh tope corona cases may increase after diwali health minister rajesh tope in nashik.
7th Pay Commission | दिवाळीसाठी 7000 रुपये वाढून येईल कर्मचार्यांचा पगार, मोदी सरकारने केली घोषणा