नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील नागौरमधून असे काही धक्कादायक छायाचित्रे आणि व्हिडीओ समोर आले आहेत जे विचार करायला लावणारी आहेत. येथे चोरीच्या आरोपावरून दोन दलित तरुणांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली आहे. प्रायव्हेट पार्ट मध्ये पेट्रोल टाकण्यात आले, स्क्रूड्राइव्हरही वापरले गेले. हा व्हिडिओ आल्यानंतर पुन्हा एकदा दलित अत्याचाराविषयी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटद्वारे या घटनेवर टीका केली असून राज्य सरकारला यावर कारवाई करण्यास सांगितले आहे. नागौरचा हा व्हिडिओ काही दिवस जुना असला तरी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण आता या व्हिडीओने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये, दोन दलित तरुण स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत आहेत. आणि वारंवार सोडण्याची विनंती करत आहेत, परंतु मारणाऱ्यांवर काही फरक पडत नाही. या घटनेनंतर राज्यातील काँग्रेस सरकारला भारतीय जनता पक्षाने लक्ष्य केले आहे.
काय आहे प्रकरण ?
हा व्हिडिओ राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील आहे. पाचौरी पोलिस स्टेशन परिसरातील करणू सर्व्हिस सेंटर मध्ये चोरी केल्याचा आरोप दोन तरुणांवर करण्यात आला. त्यानंतर सेवा केंद्रातील कामगारांनी दोघांना मारहाण केली. घीराम आणि पन्नालाल हे दलित युवक काही कामानिमित्त सर्व्हिस सेंटर मध्ये गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई केली जात आहे. नागौर एएसपी राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ 16 फेब्रुवारीचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 342, 323, 341, 143 आणि SC/ST कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सात जणांची नावे उघडकीस आली आहेत, त्यामध्ये भीमसिंग, ऐदानसिंग, जासूसिंग, सवाई सिंग यांचा समावेश आहे. निष्पन्न चौकशीसह या घटनेस चालवणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नागौर एएसपी राजकुमार, डीएसपी मुकुल शर्मा करीत आहेत.
राहुल गांधींनी ट्विट करून दुःख व्यक्त केले
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत राज्य सरकारला कठोर कारवाई करण्यास सांगितले. गुरुवारी राहुल यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘राजस्थानमधील नागौर येथून दोन दलित तरुणांना मारहाण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात कठोर कारवाई करावी आणि दोषींना कठोर शिक्षा करावी. ‘ या घटनेनंतर समाज कल्याण मंत्री भंवर मेघवाल यांनीही राज्य सरकारला निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, सरकार या प्रकरणात अत्यंत गंभीर आहे. पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशा प्रकारे दलितांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत.
भाजपने कॉंग्रेस सरकारला घेरले
भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया म्हणाले की, कॉंग्रेस सातत्याने लोक कल्याणकारी सरकार असल्याचा दावा करते, पण ही घटना निंदनीय आहे. या प्रकरणात सरकारने कठोर पाऊल उचलली पाहिजेत. त्याचवेळी कॉंग्रेस सरकार दलितांच्या संरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी केला. नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनीही या घटनेचा निषेध केला असून आयजीशी बोललो असल्याचे म्हंटले आहे. गुरुवारी राजस्थान सरकारने आपले बजेट सादर केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन अद्याप चालू आहे आणि विधानसभेत या विषयावर कॉंग्रेस सरकारला घेराव घालणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.