जयपुर : वृत्तसंस्था – तुम्ही सर्वांनी मुगल ए आजम हा सिनेमा पाहिला असेल. यात दाखवलं आहे की, अकबर बादशाह आपला मुलगा सलीम याला प्रेम करण्याची शिक्षा देत त्याला भींतीत जिवंत गाडतो. बहुतेक हे ऑनर किलींगचं पहिलं प्रकरण होतं. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 400 वर्षे सरल्यानंतरही प्रेमाला गुन्हाच मानलं जात आहे. आता राजस्थान असं राज्य बनलं आहे जिथे प्रेम करणं गुन्हा नाही, उलट अशा कपल्सना पोलिस स्वत: सुरक्षा देणार आहेत.
तीन दिवसांपूर्वीच सोमवारी विधानसभेत ऑनर किलींग विधेयक 2019 पास करण्यात आलं आहे. असं कायदा लागू करणारं राजस्थान पहिलं राज्य आहे. हा कायदा बनताच पोलिसांनी याचा प्रचार करण्यासाठी मुगल ए आजमचाच सीन घेतला आहे. जो त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. पोस्ट करताना त्यांनी लिहिले आहे की, “आता मुगल ए आजमचा जमाना गेला. आता प्रेम करणं अपराध नाही. जर प्रेम करणाऱ्यांना काही शारीरिक त्रास झाला तर त्रास देणाऱ्यांना जन्मठेपासून तर मृत्यू दंडाची शिक्षाही होऊ शकते. याशिवाय 5 लाखांचा दंडही लावला जाऊ शकतो.” शेवटी हार्ट इमोजी पोस्ट करत लिहिले आहे की, “कारण आता प्रेम करणं गु्न्हा नाही.”
https://twitter.com/PoliceRajasthan/status/1159391453409247232
मैत्री केली तर निभवावी लागेल
रविवारी फ्रेंडशिप डे च्या दिवशी पोलिसांनी ट्विट केलं होतं की, “तुमच्याशी मैत्री केली आहे तर निभवावी लागेल. फ्रेंडशिप डे च्या दिवशी राजस्थान पोलिसांचा तुम्हाला शब्द आहे की, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू. कोणत्याही अटी किंवा शर्तीशिवाय. तुम्हा सर्वांच प्रेम आमची ताकद आहे.”