मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचलनालयानं चौकशी केली. ही चौकशी साडेआठ तासांहून अधिक काळ चाली. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करतांना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना २० कोटींचा फायदा कसा झाला असा प्रश्न ईडीला पडला आहे. मातोश्री रियल्टर्समध्ये राज ठाकरे यांनी कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तरीही त्यांना २००८ मध्ये २० कोटींचा फायदा झाला.
मातोश्री रियल्टर्स कंपनी स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतले होते आणि याव्यतिरिक्त कंपनीला एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही मिळाली होती. सूत्रांनी म्हंटले आहे की, ही मदत कशी मिळाली असा असा प्रश्न सक्तवसुली संचलनालयाला पडला असल्याचे सांगितले आहे. राज ठाकरे यांचे मातोश्री रियल्टर्समध्ये २५ टक्के शेयर्स होते. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने सांगितले आहे की, कागदपत्रांची पडताळणी सुरु असून पुन्हा आवश्यकता भासल्यास राज ठाकरे यांना चौकशीला बोलावण्यात येईल.
कोहिनूर सीटीएनएल कंपनी कोहिनूर स्क्वेअरचं बांधकाम करत आहे. आयएल अँड एफएसने त्यांची भागिदारी विकल्यानं कंपनीला १३५ कोटींचं नुकसान झालं. त्याचवेळी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारी राज ठाकरेंनी ८० कोटी रुपयांमध्ये विकली.जमिनीचे दर वाढल्यामुळे आम्हाला फायदा झाला असं राज ठाकरेंनी म्हटल्याचं समजते आहे. यामधून राज ठाकरेंना २० कोटी रुपयांचा फायदा झाला. एका वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, उरलेली रक्कम राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारांना दिली. राज ठाकरे यांच्या कंपनीनं गुंतवलेल्या पैशांमधील ३ कोटी रुपये सहकारी बँकेकडून तर १ कोटी दोन बँक खात्यातून देण्यात आले होते. मातोश्री रियल्टर्समध्ये वेगवेगळ्या बँक खात्यांमधून ३६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती अशी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. हे व्यवहार संशयास्पद वाटल्यानं तपास सुरु कऱण्यात आला.