बहुजननामा ऑनलाइन टीम – वीजबिलाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, (Raj Thackeray)देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिले भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिल भरू नका हा कुठला न्याय (raj-thackeray-fadnavis-pay-
राज्यात लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. भाजप आणि मनसेने वीजबिल माफीवरून आक्रमक भूमिका राज्यभर आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरे, फडणवीस आणि बावनकुळेंनी वीजबिल भरले असल्याच्या नितीन राऊत यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही वीजबिल भरूच आणि ते भरायलाच हवे, नितीन राऊत यांनीही ते भरायला हवे, प्रश्न लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांचा नाही. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब जनतेचा आहे. त्यांना आलेली हजारो रुपयांची बिल ते भरणार कुठून? हा प्रश्न असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफ करण्याची घोषणा करून त्यानंतर आपला शब्द फिरवून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. यावर नितीन राऊत यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली, तर दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्राने राज्याच्या हक्काचा पैसा दिलेला नाही. राज्याने सगळी तिजोरी कोरोनाकडे वळवली आहे, असे राऊत म्हणाले. वीजबिलमाफीसाठी राज्य सरकारमध्ये कुणी अडचण आणण्याचा प्रश्न नाही. प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेचा असल्याचेही ते म्हणाले.