बहुजननामा ऑनलाइन टीम – पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे(Rains) 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारीप्रताप जाधव यांनी गुरूवातरी ही माहिती दिली. प्रताप जाधव यांनी सांगितले की, सोलापूर, सांगली आणि पुण्यात बुधवारपासून आतापर्यंत पावसामुळे घडलेल्या घटनांमध्ये एकुण 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्ये 14, सांगलीत 9 आणि पुण्यात 4 लोकांचा मृत्यू झाला. त्यांनी म्हटले की, पाऊसामुळे(Rains) सोलापूर सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे.
अधिकार्यांनी सांगितले की, तिन जिल्ह्यांतील 20,000 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पूर्ण रात्र पाऊस असल्याने मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सतारा आणि कोल्हापुरमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये भिंत पडल्याने बुधवारी 6 लोकांचा मृत्यू झाला, अन्य लोकांचा मृत्यू पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे झाला आहे.
अधिकार्याने सांगितले की, पुण्यात चार लोकांचा मृत्यू दौंड तहसिलच्या खानोटामध्ये एका धबधब्यात बुडाल्याने झाला. एक व्यक्ती बपत्ता आहे. सांगली जिल्ह्यात अशाच घटनांमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.
त्यांनी म्हटले की, प्राथमिक सूचनेनुसार सोलापूर, सांगली आणि पुणेपासून सुमारे 20 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. सोलापूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले की, पंढरपुरमध्ये सुमारे 1,650 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तालुक्यात मदतीसाठी एनडीआरएफच्या जादा टीम बोलावण्यात आल्या आहेत.
हवामान विभागानुसार, पुणे शहरात बुधवारी 96 मिली पाऊस झाला. कोल्हापुरात 56 मिली पाऊस झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य प्रशासन, लष्कर, नौदल आणि हवालई दलास हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे.