मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून (Monsoon in Maharashtra) दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबईसह (Mumbai) परिसरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर आता पुढील तीन तासांत मुंबईसह पुणे (Pune), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांत मुसळधार पावसचा इशारा हवामन खात्याकडून देण्यात आला आहे. याशिवाय प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं (IMD) दिला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
कृपया हे देखील वाचा:
RCFL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
आता 12 वर्षाखालील बालकांसाठीही कोरोना लस, ट्रायल सुरु
या’ दिवशी BoB विकणार ही 46 खाती, जाणून घ्या कोणाची नावं आहेत यादीत