मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मान्सूनच्या परतीचे वारे आता वाहू लागले आहेत. मान्सून परतीच्या मार्गावर असून राज्यात मुळसधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. राज्यात आठवडाभर मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात कोकणासह आतल्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार तर इतर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा कापणीला आलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1315198384752390149
गेल्या काही आठवडया पासुन राज्यात पावसानं बर्यापैकी उसंत घेतली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये वातावरण बदलल्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाऊस जर पडला तर त्याचा मोठा फटका बळीराजाला बसणार आहे. सध्या सोयाबीनसह इतर काही पिकं काढणीला आली असल्यानं शेतकरी चिंतातूर आहे. वेळावेळच्या पावसामुळं सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. सोयाबीन बरोबरच भाजीपाला आणि इतर फळ-पिंकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. कोरोनाच्या काळामुळं मंदी आणि त्यामधून मजुरांची कमतरता यामुळं बळीराजासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे शहराच्या काही भागात शनिवारी दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानकपणे पडलेल्या पावसामुळं नागरिकांची बंडाळी झाली. 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता असल्यानं सावध राहा असं वेधशाळेनं सांगितलं आहे. अंदमानजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा जास्तीच तीव्र होत असल्यानं महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला धोका असल्याची माहिती वेधशाळेनं दिली आहे. आठवडयाभरात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडल्यास बळीराजासमोर आणखी एक संकट उभं राहणार आहे.