नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर वाढवल्या बाबत सारवासारव केली आहे. महाराष्ट्रातील पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्म तिकिटचा दर वाढवून 50 रुपये करण्यात आला आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात टीका सुरू झाली आहे. विरोधकांनी सुद्धा यावरून टीका सुरू केली आहे. दरम्यान, प्लॅटफॉर्म तिकिट का वाढवले याबाबत रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेच्या प्रवक्त्याने म्हटले की, कोरोना व्हायरस संसर्गाची वाढती महामारी पाहता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट वाढवून 50 रूपये केले आहे.
जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावर तापू लागले तेव्हा रेल्वेने यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेच्या प्रवक्त्याने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून माहिती देताना म्हटले की, महाराष्ट्राच्या पुणे जंक्शनद्वारे प्लॅटफार्म तिकिट दर 50 ठेवण्याचा उद्देश, अनावश्यक लोकांना स्टेशनमध्ये येण्यापासून रोखणे हा आहे. तिकिटाचा दर जास्त असेल तर अनावश्यक लोकांची गर्दी आपोआप कमी होईल. गर्दी कमी राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सोपे जाईल. यापूर्वी देखील कोरोना काळात रेल्वेने असे प्रकार केलेले आहेत.
रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट 50 रूपये केल्याने सर्वत्र टीकेचा सूर आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारला सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळात रेल्वे प्लॅटफार्म तिकिट 3 रुपये होते, भाजपाच्या राज्यात 50 रुपये झाले आहे.
रेल्वे स्टेशनवर थांबण्यासाठी प्रवाशांना किंवा त्यांच्या सोबत आलेल्यांना रेल्वे दोन तासांसाठी प्लॅटफॉर्म तिकिट जारी करते. याचा अर्थ जर तुम्ही एखाद्या नातेवाईकाला, मित्राला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेलात तर 50 रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकिट काढून तुम्हाला 2 तास तेथे थांबण्याची परवानगी मिळेल. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ही पद्धत अवलंबली आहे.
नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर वाढवल्या बाबत सारवासारव केली आहे. महाराष्ट्रातील पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्म तिकिटचा दर वाढवून 50 रुपये करण्यात आला आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात टीका सुरू झाली आहे. विरोधकांनी सुद्धा यावरून टीका सुरू केली आहे. दरम्यान, प्लॅटफॉर्म तिकिट का वाढवले याबाबत रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेच्या प्रवक्त्याने म्हटले की, कोरोना व्हायरस संसर्गाची वाढती महामारी पाहता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट वाढवून 50 रूपये केले आहे.
जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावर तापू लागले तेव्हा रेल्वेने यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेच्या प्रवक्त्याने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून माहिती देताना म्हटले की, महाराष्ट्राच्या पुणे जंक्शनद्वारे प्लॅटफार्म तिकिट दर 50 ठेवण्याचा उद्देश, अनावश्यक लोकांना स्टेशनमध्ये येण्यापासून रोखणे हा आहे. तिकिटाचा दर जास्त असेल तर अनावश्यक लोकांची गर्दी आपोआप कमी होईल. गर्दी कमी राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सोपे जाईल. यापूर्वी देखील कोरोना काळात रेल्वेने असे प्रकार केलेले आहेत.
रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट 50 रूपये केल्याने सर्वत्र टीकेचा सूर आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारला सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळात रेल्वे प्लॅटफार्म तिकिट 3 रुपये होते, भाजपाच्या राज्यात 50 रुपये झाले आहे.
रेल्वे स्टेशनवर थांबण्यासाठी प्रवाशांना किंवा त्यांच्या सोबत आलेल्यांना रेल्वे दोन तासांसाठी प्लॅटफॉर्म तिकिट जारी करते. याचा अर्थ जर तुम्ही एखाद्या नातेवाईकाला, मित्राला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेलात तर 50 रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकिट काढून तुम्हाला 2 तास तेथे थांबण्याची परवानगी मिळेल. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ही पद्धत अवलंबली आहे.