मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे(Railway) स्थानक आणि मुंब्रा रेल्वे (Railway) स्थानकादरम्यान शनिवारी (दि. 29) सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान राज्यात लॉकडाऊनमुळे कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. अशातच चोरट्याने लोकलमध्ये शिरुन महिलेचा जीव घेतल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विद्या पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, विद्या पाटील शनिवारी संध्याकाळी लोकलने प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ 5 महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होताना एका चोरट्याने लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. विद्या पाटील यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मुंलींच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी खुली नसतानाही चोरटा लोकलमध्ये आलाच कसा असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्यावर येईल Instant Glow
पोलिसांची शासकीय गाडी मद्यपी चालकाच्या हाती, शिक्रापूर-चाकण चौकातील खळबळजनक प्रकार
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक, पत्नी निशाने मारहाण केल्याची दाखल केली होती तक्रार
‘नेमकं चाललंय काय? मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया