नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी IRCTC ने एक अलर्ट जारी केला जे रेल्वे प्रवासादरम्यान माहिती किंवा तक्रारीसाठी सोशल मीडियाचा वापर करतात त्यांच्यासाठी हा अलर्ट आहे. IRCTC चा हा अलर्ट तुम्ही दुर्लक्षित केला तर त्याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल.
काय आहे अलर्ट?
IRCTC कडून ट्विटरवर अनेक ट्विट केले गेले असून यानुसार IRCTC चे युजर्सना टार्गेट केले जात आहे. जे आपल्या तक्रारीसाठी किंवा चौकशीसाठी सोशल मीडियावर मोबाईल क्रमांक, पीएनआर आणि ट्रांजॅक्शन आयडी सारखे वैयक्तिक माहितीही शेअर करतात. अशा युजर्ससह बँकिंग फ्रॉड केला जाऊ शकतो. IRCTC ने लोकांना या माहितीबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर न करण्याचे अपील केले आहे. यासोबतच IRCTC ने सांगितले की, भारतीय रेल्वे फक्त थेट एसएमएसद्वारे माहिती मागते. IRCTC ची रिफंड प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसतो.
जर IRCTC ने तिकीट कॅन्सल केले तर रिफंडच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही इतर व्यक्तीच्या मदतीची गरज नसते, असे त्यांचे म्हणणे आहे. अशात तुम्ही कोणत्याही कॉल किंवा एसएमएसपासून सावधान राहा. हे मेसेज किंवा कॉल तुमच्या बँक खाते खाली करू शकते.