नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – आज दि १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड लोकसभा अनुषंगाने प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.देवेंद्र फडणवीस यांच्या सभे साठी अथांग गर्दीचा महासागर या वेळी उपस्थित होता. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरवाती पासून ते शेवट पर्यंत राहुल गांधी,अशोक चव्हाण व राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड कायम ठेवली ते बोलताना म्हणाले की,देशाच्या जनतेने ठरवलंय मोदी ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत,पंचायत समिती नाही असे ही देवेंद्र फडणवीस या वेळी बोले,हा देश कुणाच्या हा हातात राहू शकतो हे जनतेला कळत आहे त्या मुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असे या वेळी ते बोललं.
जवळ जवळ 60 वर्षे अत्याचारी,भ्रष्टाचारी,दुराचारी, अनाचारी आपण यांचे संस्कार बघीतले आहे.सामान्य माणसांना न्याय देण्याच काम मोदी सरकार करत आहे.ही पाच वर्षे मोदींची स्वच्छ सरकार तुम्ही बघितल.राहुल गांधी याचं आश्चर्य वाटतंय असही ते यावेळी बोलले,ते म्हणाले की राहुल गांधी यांनी गरिबी हटाव हा नारा दिला पण त्यांच्या आतापर्यंतच्या मागील पाच पिढ्या तेच सांगताय तुमच्या पणजोबा सुद्धा ,आजी सुध्दा, वडील सुध्दा, आई सुध्दा गरीब हटाव गरिबी हटाव नारे दिले आहे.गरिबांना 72 हजार मिळणार असलेली भाषणे राहुल गांधी यांनी केले,नेमकं हा आकडा कुठून शोधून काढला या बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले,ते म्हणाले राहुल गांधी यांना काय कळत ते लिहून दिल तेच वाचतात यात त्यांची काय चूक आहे असेही त्यांनी ह्या वेळी बोलून दाखवले.