नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमेठीतून निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा यांचा लोकसभेत पराभव झाला, तर राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या अमेठीतून राहुल यांच्या विरोधात भाजप उमेदवार स्मृती इराणी आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी २०१६ मध्ये भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. राष्ट्रप्रेम शिकायचे असले तर माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून शिकले पाहिजे. असे सिद्धू यांनी जनतेशी संवाद करताना सांगितले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाची कमान सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांची स्तुती करत सिद्धू म्हणाले, सोनिया यांच्या नेतृत्तामुळेच काँग्रेस पक्षाला १० वर्षात म्हणजेच २००४ ते २०१४ पर्यंत सत्तेत गड राखता आला.
जो आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो त्याला राष्ट्रप्रेम म्हटले जाते तर ज्यांनी हा प्रामाणिकपणा सोडला आहे त्याला देश विरोधी म्हटले जाते. असे म्हणत सिद्धू यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला आहे.