नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असून यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले असताना त्यांना आज देशभरातून आदरांजली वाहत आहेत. आणि अशातच आता काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न निर्माण करत नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. राहुल यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शवपेट्यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच त्याखाली त्यांनी तीन प्रश्न केले आहेत.
राहुल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये “आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० शहीद जवांनाच्या हौतात्माचे स्मरण करत आहोत. त्यानिमित्त आपण काही प्रश्न विचारायला हवेत… १) या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?, २) या हल्ल्याच्या तपासामधून काय निष्पन्न झालं ? ३) ज्या सुरक्षासंदर्भातील त्रुटींमुळे हा हल्ला झाला त्यासाठी भाजपा सरकारमधील कोणत्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आलं ?,” असे प्रश्न केले आहेत.
Today as we remember our 40 CRPF martyrs in the #PulwamaAttack , let us ask:
1. Who benefitted the most from the attack?
2. What is the outcome of the inquiry into the attack?
3. Who in the BJP Govt has yet been held accountable for the security lapses that allowed the attack? pic.twitter.com/KZLbdOkLK5
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2020
राहुल यांनी केलेल्या या ट्विटमुळे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी त्यांच्यावर निशाणा साधत “राहुल गांधी तुम्हाला लाज वाटायला हवी. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला फायदा झाला असं तुम्ही विचारत आहात ? इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येने कोणाचा फायदा झाला असा सवाल देशाने विचारल्यास काय उत्तर द्याल ? एवढ्या खालच्या थराचे राजकारण करु नका. थोडी तरी लाज बाळगा,” असे म्हटले आहे. तेव्हा राहुल यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वादंग उठू शकतो.
शर्म करो राहुल गांधी
पूछते हो पुलवामा हमले से किसका फायदा हुआ?
अगर देश ने पूछ लिया कि इंदिरा राजीव की हत्या से किसका फायदा हुआ , फिर क्या बोलोगे?
इतनी घटिया राजनीति मत करो
शर्म करो https://t.co/9C5AsNyMba
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 14, 2020