नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु आहे. याचे पडसाद राज्यापासून ते दिल्लीपर्यंत उमटले होते. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी यासंदर्भात कुठलीही मोठी प्रतिक्रिया दिली नाही. तसेच महाविकासआघाडीच्या कोणत्याही चर्चेत ते सहभागी झाले नाहीत. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापण्याच्या घडामोडी सुरु असताना राहुल यांच्यामुळे अडथळे येत असल्याची माहिती मिळाली आहे. राहूल गांधी यांच्यामुळेच काँग्रेसकडून निर्णय घ्यायला उशीर झाला आणि याच संधीचा फायदा घेत भाजपने अजित पवारांना हाताशी धरुन सरकार स्थापन केले होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिना उलगडून झाला तरी सरकार स्थापन झाले नव्हते. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती, मात्र भाजपने ती मागणी अमान्य केल्याने शिवसेनेने वेगळा संसार थाटात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला. १२ नोव्हेंबरपर्य़ंत तीन पक्षांचे सरकार स्थापण्या विषयी सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सहमती झाली. मात्र, काँग्रेसकडून या निर्णयाला उशीर होत होता.राहुल गांधी आणि त्यांच्या जवळचे काँग्रेस नेते शिवसेसोबत जाण्यात फारसे उत्सुक नव्हते. शिवसेनेसमोर राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांतील गटाने काही अटी घातल्या होत्या, त्यामध्ये वीर सावरकरांशी शिवसेनेनं जवळीक साधू नये, हिंदू राष्ट्रवाद सोडून द्यावा, मराठीच्या मुद्यावरुन राजकारण करु नये अशा अटी राहुल गांधींच्या गटाने शिवसेनेसाठी तयार केल्या होत्या.
शिवसेनेने या अटी मान्य केल्यावर महाविकासआघाडीची औपचारीक घोषणा करावी असे या गटाला वाटत होते. यामध्ये के.सी वेणुगोपाल हे देखील होते असे सांगण्यात येत आहे. काश्मीर प्रश्नावर शिवसेनेची भूमिका जगजाहिर असल्याने काँग्रेसचे नेते गुलाम नवी आझाद सुद्ध शिवसेनेशी युती करण्याच्या विरोधात होते. अखेर यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहभाग घेत थेट सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेला तयार केले. त्यामुळे सोनिया गांधी यांना निर्णय घेताना विलंब लागत होता. त्यातच राहुल गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत नकार होता. त्यामुळे काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्यास उशिर झाल्याने राज्यात अनेक घडामोडी घडल्या.
Visit : bahujannama.com