नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ च्या घोषणाबाजीवर दिलेल्या स्पष्टीकरणावर राहुल गांधींनी मंगळवारी सकाळी ट्विट केले. राहुल गांधींनी लिहिले की तुम्ही यावर काम करत रहा आणि पंतप्रधानांना कूटनीतीबदल थोडा शिकवत राहा.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘एस. जयशंकर जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षमता लपवून ठेवल्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्या या पाठिंब्यामुळे भारतासाठी डेमोक्रॅटशी संबंध असण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मला आशा आहे की आपल्या हस्तक्षेपामुळे आता हे सगळ व्यवस्थित होईल. आता आपण यावर काम करत असल्यास, त्यांना (पंतप्रधान) काही कूटनीतीबद्दलही शिकवा. राहुल गांधी यांचे हे ट्विट तेंव्हा आले होते. जेव्हा एस. जयशंकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं होतं. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाउडी मोदीमधील ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ या घोषणेचा वापर करण्याबाबत स्पष्टीकरण दिले.
राहुल गांधींच्या अगोदरही बऱ्याच कॉंग्रेस नेत्यांनी यावेळी ‘ट्रम्प सरकार’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनीही हाउडी मोदींच्या वेळी यावर प्रश्न उपस्थित केले होते आणि ते म्हणाले होते की देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी दुसर्या देशात जाणे हे भारताचे विदेश धोरण नाही.
परराष्ट्रमंत्र्यांनी काय उत्तर दिले ?
अमेरिकेतील एका पत्रकाराच्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी हे बोललेचं नाहीत तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही उल्लेख केला होता त्यावर त्यांनी लोकांना सांगितले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ वापरल्याच्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर म्हणाले, की त्यावर पंतप्रधान हे म्हणाले. या परिस्थितीत कोणताही गैरसमज होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या ह्युस्टन येथे हाउडी मोदी कार्यक्रमात या घोषणेचा उल्लेख केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदी म्हणाले, “… डोनाल्ड ट्रम्प भारतात चांगलेच जोडले गेले आहेत. जेव्हा उमेदवार ट्रम्प यांनी ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ म्हटले तेव्हा त्याचा आवाजही भारतात गेला. व्हाइट हाऊसमध्ये त्यांची दिवाळी साजरी केल्याने बर्याच लोकांना आनंद झाला.’
Visit : bahujannama.com