नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये देशातील बेरोजगारीकच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आणि ही चिंताजनक बाब आहे. असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. नोटबंदी सारखा प्रयोग अर्थकारनाला नुकसानकारक ठरल्याने सरकारने या योजनांच्या संबंधात आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.
एका दूरचित्रवाणीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले कि ‘एनएसएसओ’ ने या संबंधात जाहीर केलेला डाटा चुकीचा आहे.असे कसे म्हणता येणार. परंतु त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे देशाचा डाटा हा विश्वनीय आहे. याची खात्री जगाला पटवून देण्याची गरज आहे.असेही राजन यांनी म्हटले आहे. या आपल्या आकडेवारीच्या पद्धतीतील दोष दूर करून त्याचाहीं नीट आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सर्वत्र जगामध्ये विशेतः पाश्चिमात्य देशातही बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. त्याचे पडसाद भारतात उमटणे स्वाभाविकच आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करणे
परवडणारे नाही. सरकारनी लक्षात घेतले पाहिजे.