मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधीकारी यांना दिले आहेत. इमारतीच्या संरक्षण भिंत बांधताना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला.
Extremely saddened to know about loss of lives in the Kondhwa, Pune wall collapse incident.
My deepest condolences to the families and prying for speedy recovery of the injured.
Directed Pune Collector to conduct an in-depth enquiry.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 29, 2019
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थीक मदत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या कोट्यातून ही मदत दिली जाणार आहे. दरम्यान, या घटनेत काही कुटुंबातील सर्वच व्यक्ती मयत झाले आहेत. त्यामुळे शितारे यांनी देऊ केली आर्थीक मदत कोणाला देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Pune: Death toll rises to 15; search & rescue operation is underway. #Maharashtra https://t.co/sV7p2QUnuy
— ANI (@ANI) June 29, 2019
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हि घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.