पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आठ वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना पुण्यात Pune घडली आहे. ही घटना पुण्यातील Pune किरकटवाडी येथील ऊर्जा डेअरीजवळ शनिवारी (दि.29) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अतुल सुरेश मोरे (वय-24 रा. किरकटवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विराज उर्फ मोश्या राजेंद्र गब्दुले (वय-26) आणि अविनाश करंजवाणे (वय-27 दोघे रा. किरकटवाडी) यांना पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षापूर्वी झालेल्या भांडणावरुन अतुल मोरे याने तू माझ्या भावाला का मारले, म्हणून विराज याच्या दुचाकीचे नुकसान केले होते. दुचाकीचे नुकसान भरून दे, असे विराज आणि अविनाश यांनी अतुलला सांगितले होते. मात्र, अतुलने नुकसान भरुन देण्यास नकार दिला. किरकटवाडी येथील ऊर्जा डेअरी जवळ शनिवारी सायंकाळी अतुल बसला होता. त्यावेळी आरोपींनी अतुलच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन अतूलचा मृत्यू झाला.आरोपींनी खून करुन घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आवारे, सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली. तपास पथकांनी आरोपींचा शोध घेऊन 12 तासात अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, घोड पाटील, प्रदीप नांदे, अजित शिंदे, दिलीप शिंदे, पोलीस हवालदार संजय शेडगे, रामदार बाबर यांच्या पथकाने केली.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’
दुर्दैवी ! मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 8 गाभण मेंढ्या ठार तर 16 जखमी
भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी
तेजश्री प्रधाननं पहिल्याच हिंदी सिनेमात दिलाय लीप लॉक, चित्रपट अद्याप…