मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले. वस्त्यांमध्येही पाणी घुसले होते. पुरानं आतापर्यंत ११ जणांचा बळी घेतला आहे. पुण्यातील या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पुण्यात पुराची परिस्थिती असतांना सत्ताधारी जागावाटपाच्या चर्चा करण्यात मग्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
तिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल.आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. पुण्यात झालेल्या पुरस्थितीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल, पण आधी पुण्यातील पुरस्थितीकडे लक्ष द्या.
मदतकार्याला उशीर झालेला चालणार नाही, असं भुजबळ म्हणाले. पुण्यात पूरस्थिती आहे तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे नेते दिल्लीत गेले आहेत हा मुद्दा पुढे करून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही. पुण्यात पूरपरिस्थिती असताना मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे दिल्लीत गेले आहेत, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
Visit : bahujannama.com