पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | चंदनचोरी सारख्या गंभीर प्रकरणात गेल्या 14 वर्षांपासून फरार असलेल्या एकाला वानवडी पोलीसानी सापळा रचून अटक केली. प्रताप आप्पा मिसाळ (वय 38, रा. वेळापूर. ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शासकीय ए.एफ.एम.सी बंगल्यात शिरून चोरट्यानी चंदनाची झाडे कापून नेली होती. बंगला 6 व 7 मध्ये हा प्रकार घडला आहे. 2007 साली मध्येही घटना घडली होती. यानंतर तिघा चोरट्यांची नावे समोर आले आहे. सोमनाथ साठे आणि बाळू धोत्रे या दोघांना पकडले होते. मात्र, प्रताप मिसाळ हा गेल्या 14 वर्षापासून गायब होता. तो काही केल्या तो सापडत नव्हता. दरम्यान फरार व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार माहिती घेतली जात होती.
यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गुरव यांच्याकडून शोध घेत असताना तो वेळापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला तेथे जाऊन पकडण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गुरव,ज्ञानदेव गिरमकर, गिरीश गोस्वामी यांच्या पथकाने केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा
लॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा