पुणे : बहुजननामा ऑनलाईन – फौजदारी खटला न्यायाधीशांना मॅनेज करुन रद्द करण्यासाठी खासगी महीलेच्या माध्यमातून ५० हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणात लाच लुचपत विभागाने थेट महिला न्यायाधीश यांना अटक केली आहे. न्यायाधीशालाच अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अर्चना दीपक जतकर (मावळ) असे अटक केलेल्या महीला न्यायधीशाचे नाव आहे. याप्रकरणी मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना अटक केली. तर लाच घेताना प्रथम खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29) यांना एसीबीने 50 हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आज एसीबीने न्यायाधीश अर्चना जतकर याना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
प्रकरण काय आहे…
मावळ न्यायलायात सुरु असलेल्या एक फौजदारी खटला मॅनेज करुन रद्द करण्यासाठी खासगी महीलेच्या माध्यमातून ५० हजार लाच स्विकारली होती. तिला अटक केली होती. यानंतर तिच्या मार्फत प्रथम दंडधिकारी महिला न्यायाधीश यांचा सहभाग आढळला. यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांचा सहभाग आढळला.