नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या नापाक कारवायांमुळे मागच्या वर्षी आजच्याच दिवशी आपण आपले 40 जवान गमावले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूणे झाले आणि देश शहीद जवानांना अभिवादन करत आहे. सीआरपीएफने आज आपल्या जवानांची आठवण म्हणून ट्विट केले आहे. यात लिहिले आहे, हमने भूला नहीं, हमने छोडा नही. 14 फेब्रुवारीला जेव्हा हल्ला झाला होता, तेव्हा सुद्धा सीआरपीएफने अशाच प्रकारचे ट्विट केले होते.
शुक्रवारी सीआरपीएफने ट्विट केले की, तुम्हारे शौर्य के गीत, कर्कश शोर में खोये नहीं. गर्व इतना था कि हम देर तक रोये नहीं. पुढे लिहिले आहे, हमने भूला नहीं, हमने छोड़ा नही. हम अपने भाईयों को सलाम करते हैं, जिन्होंने पुलवामा में देश के लिए जान दी. हम उनके परिवारों के साथ कंधे से कंधा लगाकर खडे हैं.
https://twitter.com/crpfindia/status/1228023791621533696
…जेव्हा सीआरपीएफने म्हटले, हम भूलेंगे नहीं !
ज्याप्रकारचे आज ट्विट करण्यात आले आहे, काहीसे असेच ट्विट मागच्या वर्षी करण्यात आले होते. जेव्हा संपूर्ण देश जवान गमावल्याच्या दुखात बुडाला होता. सीआरपीएफने यात म्हटले होते, हम भूलेंगे नहीं, हम बख्शेंगे नही. पुलवामा में शहीद हुए जवानों को हम सलाम करते हैं और उनके परिवारों के साथ हैं. इस जघन्य अपराध का बदला लिया जाएगा.
पुलवामा हल्ला करणार्या दहतवाद्यांना लष्कराने ताबडतोब धडा शिकवण्यास सुरूवात केली. 100 तासांच्या आत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैशचा स्थानिक दहशतवादी कामरान यास ठार करण्यात आले होते. यानंतर काही दिवसातच 27 फेब्रुवारीला भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एयरस्ट्राईक केला होता, ज्यामध्ये शेकडो दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला होता. याशिवाय त्या दहशतवाद्यांचाही खात्मा केला जे पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होते. यामध्ये आदिल अहमद डार, मुदसिर खान, कामरान आणि सज्जाद भट्ट यांच्या नावांचा समावेश होता.