नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याला एक वर्ष होणार असून या हल्ल्यात शहीद झालेल्यांना अजूनही सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारने फक्त आश्वासने दिली पण ती पूर्ण काही केली नाहीत. अक्षरशः शहिदांचे कुटुंब कार्यालयात फिरून-फिरून थकले आहेत.
अशीच एक गोष्ट केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कौशल कुमार रावत यांची असून ते १४ फेब्रुवारी २०१९ रोजी एका बसमध्ये होते, तिला दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्याने उडवले होते. शहिदांबाबत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली सर्व आश्वासने पोकळ आहेत. कौशल कुमार रावत हे आग्रा येथील रहिवासी होते. शहीद कौशल कुमार यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या आईला अश्रू अनावर होतात. सरकार, प्रशासन आणि सामाजिक संस्था अश्रू पुसण्याऐवजी म्हाताऱ्या आईला कार्यालयाभोवती फिरवत आहेत.
शहीद कौशल कुमार रावत यांची आई सुधा म्हणाल्या की, त्यांना केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेने तिची काळजी घेतली नाही. कोणताही लोकप्रतिनिधी या परिस्थितीबद्दल विचारण्यास आला नाही. तसेच जेव्हा मुलाची शेवटची भेट झाली होती, तेव्हा मोठे अधिकारी आणि नेते आले. त्या सर्वांनी मोठी आश्वासने दिली. पण आता एक वर्ष पूर्ण होणार असून आजपर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. सत्य प्रकाश रावत यांनी सांगितले की, फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून अद्याप ती पूर्ण केले नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रशासन, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांचीही मदत मिळाली नाही. सर्वात मोठी अडचण अशी आहे की घराची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे.