नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाला होता. एक वर्ष उलटून गेले तरी शहीद जवानांच्या कुटूंबाच्या जखमा अजूनही अबाधित आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील वीरपंगरा गावचे नितीन राठोड यांचे कुटुंब या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही. नितीन यांच्या गावातील आणि कुटूंबातील प्रत्येकाकडून अशी मागणी आहे की शेजारच्या देशात पाकिस्तानला कठोर धडा शिकवावा. नितीनची आई सावित्री राठोड म्हणाल्या की आम्ही वर्षभरापासून रडत आहोत.
आश्वासनांची पूर्तता नाहीच
नितीन यांची आई म्हणते ,’मला नितीनची खूप आठवण येते. आजही आम्ही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. त्याच्या फोनची वाट पाहतो. नितीनचे वडील शिवाजी राठोड म्हणाले की, नितीन शहीद झाल्यानंतर सरकारने आमच्या कुटुंबाला पाच एकर जमीन, पेट्रोल पंप, एक कोटीचा बंगला देण्याचे आश्वासन दिले होते, जे अजूनही पूर्ण केले नाही. नितीनचे शिक्षक एम.एस. चौहान सांगतात की राठोड कुटुंबाने त्यांचा मुलगा देशासाठी गमावला.
पाकिस्तानला धडा शिकवा
पुढे बोलताना नितीन यांचे शिक्षक सांगतात , ‘नितीन शहीद झाल्यानंतर सरकारने राठोड कुटुंबाला काही आश्वासने दिली होती, ती त्यांनी पूर्ण करावीत. गावातील लोकांचे म्हणणे आहे की सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत, जर आमच्या एका जवानाला ठार मारले तर आपण त्यांचे दहा जवान मारले पाहिजे. गावचे नेहरू चौहान म्हणाले की, नितीन सर्वांसोबत एकत्र राहत होता. त्यांच्या शहीद झाल्यानंतर आम्ही सर्वजण शोकात आहोत.