बहुजननामा ऑनलाइन टीम – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांना लवकरच नवरत्न आणि महारत्न असा दर्जा मिळणार आहे. इतर सरकारी कंपन्याप्रमाणेच सरकारी बँकानाही अशी दर्जा मिळेल. बँकांना महारत्न, नवरत्न, मिनी रत्न दर्जा देण्याचा प्रस्ताव आहे. बँकांना इतर कामकाजातून मोकळीक मिळावी म्हणून सरकारकडून अशी पावले उचलण्यात येत आहे.
सरकारी कंपन्याप्रमाणेच बँकांना आता इतर कामकाजातून स्वातंत्र्य मिळेल. गुंतवणूकीसह इतर अनेक आर्थिक प्रस्तावांवर बँका स्वतःच निर्णय घेऊ शकतात. बँकांना मोठे निर्णय घेण्यासाठी आता सरकारी परवानगीची आवश्यकता भासणार नाही. कंपन्यांना टर्नओव्हर, प्रॉफीटच्या आधारावर ‘रत्न’ चा दर्जा मिळतो.
बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळू शकतो. चांगल्या कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांना बँकांचे शेअर देण्याचा प्रस्ताव सुद्धा आहे.