नवी दिल्ली : वृत्तसंस्था- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी (१८) सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सिव्हील रजिस्टर (एनआरसी) संदर्भात राज्यसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, लवकरच देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल. दरम्यान, या प्रक्रियेत धर्माच्या आधारे कोणाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) वर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा म्हणाले- एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव करण्याची कोणतीही चर्चा नाही. जेव्हा एनआरसी प्रक्रिया संपूर्ण देशात लागू होईल, तेव्हा पुन्हा एनआरसी प्रक्रिया आसाममध्ये होईल. कोणत्याही धर्माच्या लोकांना भीती वाटण्याची गरज नाही. एनआरसीमध्ये सर्व लोक एकत्रित करण्याची एक प्रणाली आहे. सर्व धर्मांचे निर्वासित जे बाहेरून आले आहेत, त्यांना नागरिकत्व दिले जाईल, असे देखील अमित शहा यांनी सांगितले. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक परत आणले जाईल. एनआरसीशी त्याचा काही संबंध नाही.
HM Amit Shah in Rajya Sabha: The process of National Register of Citizens (NRC) will be carried out across the country. No one, irrespective of religion should be worried, it is just a process to get everyone under the NRC. pic.twitter.com/mpkitRMLR6
— ANI (@ANI) November 20, 2019
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) चा विरोध करत , हा कायदा संपूर्ण देशात लागू असला तरी पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही, असे स्पष्ट केले.
आसाम एनआरसी संदर्भात :
आसामच्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सची (एनआरसी) अंतिम यादी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १९ लाखाहून अधिक लोकांना वगळण्यात आले आहे. आसाममधील ३.,३०,२७६६१ लोकांनी एनआरसीमध्ये जाण्यासाठी अर्ज केला होता. १९,०६,६५७ लोकांना अंतिम यादीतून काढून टाकण्यात आले, तर ३,११,२१,००४ लोकांना भारतीय नागरिक म्हणून घोषित करण्यात आले. आपले नाव पाहण्यासाठी आपण nrcassam.nic.in वर क्लिक करू शकता किंवा https://assam.gov.in/ या लिंकवर जाऊन यादीतील नाव पाहू शकता.
Visit : bahujannama.com