बहुजननामा ऑनलाईन टीम : आज राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्यावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील विकासकामासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल सहा शब्दही दिला, अशी माहिती शवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रास माध्यमांना दिली.
महाराष्ट्रात २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही, प्रत्येक संकटांवर मात करून हे सरकार टिकऊ असे आश्वासन देखील संजय राऊत यांनी दिले आहे. दरम्यान, महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडात अजित पवारांना कोणते पद मिळणार याबाबत विचारले असता, त्यासंबंधित निर्णय शरद पवार घेतील, असे देखील राऊत यांनी सांगितले.
तसेच, तीनही मित्र पक्षांमध्ये योग्य संवाद सुरु असून कोणत्याही पदावरून वाद नाही. ठरल्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे असे देखील संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, महिन्याभर सुरु असलेला सत्ता स्थापनेचा तिढा हा सुटला असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ते आज राज्याच्या २९मुख्यमंत्री पदी शपथ घेणार आहेत. आज संघ्याकाळी ६. ४० वाजता शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Visit : bahujannama.com