मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटी लागू झाली आहे. त्यामुळे त्याचा फटकाही बसण्यास सुरुवात झाली आहे, याचा पहिला फटका वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक निधीची गरज असलेल्या रुग्णांना बसला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हि सेवा बंद करण्यात आले, त्यामुळे मात्र गरीब रुग्णांची निधी अभावी परवड झाली आहे.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने या कार्यालयांना टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना सहायता निधी बंद झाल्याने जवळपास ५ हजार ६०० रुग्णांना याचा फटका बसला आहे. ‘कार्यालय बंद आहे, चौकशी करू नये.’ असे सूचना फलक मुख्यमंत्री सहाय्यता कक्षेवर लावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता कक्षेतून ५ वर्षात जवळपास २१ लाख रुग्णांना मदत देण्यात आली. ६०० कोटी पेक्षा जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला. ६० पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा झाला आहे. परंतु आता हे कार्यालय बंद झाल्याने निधी बंद झाला आहे. या निधीचा फायदा घेणाऱ्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, आता तो निधी बंद झाल्याने रुग्णानची परवड झाली आहे.
Visit : bahujannama.com