बहुजननामा ऑनलाइन टीम : जगातील मैत्री हे असे नाते आहे की ज्यामध्ये पद आणि पैसा महत्त्वाचा नसतो त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम महत्वाचे असते. असे असल्यावर मित्र एकमेकांवर आपला जीव ओवाळून टाकत असतात. असेच काहीसे एका कार्यक्रमात पहायला मिळाले. जेव्हा देशाचे राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात गर्दीमध्ये आपल्या 12 वर्षांच्या मित्राची ओळख पटविली आणि तातडीने त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देऊन स्टेजवर बोलावले आणि आपल्याशेजारी खुर्चीवर बसविले.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठाच्या प्लॅटिनम जयंती समारंभात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आले होते. जिथे त्यांनी लोकांमध्ये त्यांचे मित्र आणि ओडिशाचे राज्यसभेचे माजी सदस्य बीरभद्र सिंग यांना पाहिले. राष्ट्रपती असूनही, रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या मित्राला पाहून ते प्रोटोकॉल विसरले. पांढरी पगडी पाहून कोविंद यांनी उपस्थितांमध्ये बसलेल्या बीरभद्रसिंगची ओळख पटविली आणि कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना स्टेजवर बोलण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही मित्र एकत्र खूप आनंदी दिसले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांच्याबरोबर फोटो काढले.
दुसरीकडे बीरभद्र सिंग गर्दीमध्ये ही राष्ट्रपतीच्या इशाऱ्यामुळे आश्रर्यचकित झाले. आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, ते १२ वर्षानंतर राष्ट्रपती यांना भेटले. 2000 ते 2006 दरम्यान राज्यसभेचे सदस्य असताना त्यांना कोविंद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले, ‘त्या काळात आम्ही दोघे एसटी / एससी समितीचे सदस्य होतो आणि आम्ही किमान दोन वर्षे एकत्र काम केले होते.
बीरभद्र सिंह यांनी असेही नमूद केले की, त्यांनी कार्यक्रमास राष्ट्रपतींना गुलाब भेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु सुरक्षा प्रोटोकॉलमुळे तसे करण्यास परवानगी दिली गेली नव्हती. त्यांनी सांगितले की राष्ट्रपतींनी त्यांना राष्ट्रपती भवनात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
Visit : bahujannama.com