मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचे पॅकेज दिले. माला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल, अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेदकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देशाला मनमोहन सिंग यांची गरज आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी समानाच्या रोखठोक सदरामध्ये केले होते.
संजय राऊत यांनी रोखठोक सदरात मजकुरावर प्रवीण दरेकर यांनी चांगलीच टीका केली आहे. दरेकर यांनी मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे स्थिर ठेवण्याचे काम केले आहे. तसेच लोकांसाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं असं सांगितले. अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेला मगील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत. ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षामध्ये केले. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही. अथवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत, असे प्रविण दरेकर म्हणाले.
हा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा
दरेकर पुढे म्हणाले, राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असा खोचक टोला लगावला. तसेच मोदी यांनी देशाचा विकासदर जास्त ढसळू दिला नाही, असे देखील दरेकर यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा 8 टक्के ठेवला. तसेच मोदींनी अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं. मला वाटत संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्रातल्या गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल, असे दरेकर म्हणाले.
सध्या नवा मनमोहन सिंग निर्माण होण्याची गरज
कोरोना संकटामुळे आपल्या देशात नाही तर जगभरात एक मंदीची लाट आली आहे. भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या, असे सांगत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करुन त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे आवश्यक असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.