नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोरोना विषाणू आणि भारतातील परिस्थितीबद्दल बोलताना पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे. जावडेकर म्हणाले की त्यांच्या मते कोरोनाचा सर्वात वाईट टप्पा पार पडला आहे, परंतु अद्याप परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत खबरदारी घ्यावी लागेल. जावडेकर यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव तर घेतले नाही, परंतु ते म्हणाले की बंगालमधील काही लोकांना भारत आणि बंगाल मध्ये युद्ध घडवायचे आहे. पण सरकारला मदत करायची आहे.
जावडेकर म्हणाले की, येथे काही लोकांनी भारत आणि बंगाल यांच्यात युद्ध करण्याचे निवडले आहे. आम्हाला युद्धामध्ये काहीही रस नाही, आम्हाला वाद-विवादात रस नाही. आम्हाला समस्या सोडवण्यात रस आहे. आम्हाला प्रत्येक राज्याची मदत करायची आहे. खरं तर, अलीकडेच केंद्राच्या कोरोना आढावा टीमला बंगालला जायचे होते तेव्हा ममता सरकारने त्यांना प्रवेश देण्यापासून रोखले होते. यानंतर पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर ममता यांनी मीटिंगमध्ये बोलू दिले नाही, असा आरोपही केला होता.
कोरोनासह जगावे लागेल
केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की चीनमधून कोरोना संक्रमण आले आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याची कोणतीही लस मिळालेली नाही, लस मिळत नाही तोपर्यंत आपल्याला एकप्रकारे कोविड – १९ सोबत जगावे लागेल. मास्क घालणे, वारंवार हात धुणे, २ मीटर अंतर ठेवणे, हे ‘न्यू नॉर्मल’ आहेत. समाजाने ४० दिवसांत हे खूप चांगले शिकले आहे.
एनपी न्यूज 24 नेटवर्क