मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – प्रकाश आंबेडकरांनी भाजपमध्ये यावे असे आवाहन आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले आहे. त्यांनी आवाहन केल्यास सर्व दलित संघटनांची एकत्र मूठ बांधण्यासाठी आपण भाजपला सोडणार का ? या प्रश्नावर उत्तर देताना आठवले यांनी स्वत:ची तयारी दर्शवली आहे. दलित चळवळीच्या ऐक्याची माझी भूमिका कायम असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे. मात्र, आंबडेकरांनी भाजपत आलं पाहिजे असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होतो. माझा फायदा भाजपला होतो. सध्या बहुजन समाजही भाजपासोबत आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपत यावे असे आवाहन आठवलेंनी आंबेडकरांना केले आहे. तसेच वंचित भाजपचीच बी टीम असेल, तर मी भाजपची ए टीम आहे, असे त्यांनी आपल्या विनोदी शैलीत म्हणाले. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून बहुजन समाज भाजपसोबत आला असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या भाजपने आपली भूमिका बदलली असून हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आपलं राजकारण करात येणार नाही, हेही पंतप्रधान नेंद्र मोदींना माहित झालं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच संविधान नसतं, तर मी कधीच पंतप्रधान झालो नसतो असेही मोदीं सांगतात. भाजप पूर्वीसारखा राहिलेला नसून तो बदलला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भाजपात यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामदास आठवले बोलत होते.
Visit : bahujannama.com