नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – मॉब लिंचिंगसारख्या घटना खास मुस्लीमांविरोधातच होत आहेत. त्यामळे या अत्याचारांना अल्पसंख्यांकांवरील अत्याचार न म्हणता मुस्लीमांवरील हल्ले म्हणायला पाहिजे. बुद्धीभेद करण्यासाठी अल्पसंख्यांक शब्द वापरला जातो आहे. हे सरकार मॉब लिंचिंग रोखण्याची सरकारची इच्छा नाही. हिंदुत्ववादी संघटना आरएसएसच्या शिकवणीप्रमाणे वागत आहेत. कायदा हातात घेऊन काही जण हे करत आहेत. असं वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अल्पसंख्यांक शब्द बुद्धीभेद करण्यासाठी
अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख येतात. मुळात मॉब लिंचिंग मुस्लीमांविरोधात होत आहे. त्यामुळे अत्याचारांना अल्पसंख्यांकविरोधी अत्याचार न म्हणता मुस्लीमविरोधी अत्याचार म्हणावे लागेल. अल्पसंख्यांक हा शब्द बुद्धीभेद करण्यासाठी वापरला जात आहे.
मॉब लिंचिंग थांबविण्याची सरकारची इच्छा नाही
मॉब लिंचिंग थांबावे अशी सरकारची इच्छा नाही. त्यामुळे हे सरकार त्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हे सत्तेत आले आहेत. हिंदुत्ववादी संघटना आरएसएसची शिकवण घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.
या नवीन घटना आहेत. या घडत राहतील. हिंदुत्वाचं राज्य आणण्याचं लायसन्स सरकारनेच दिलं आहे. अशी त्यांची मनोवृत्ती झाली आहे. त्यामुळे मुस्लीम टार्गेट होणार. असे ते म्हणाले.
अल्लाह हू अकबर .. जय श्रीराम संसदेत नको
अल्लाह हु अकरबर असो की, जय श्रीराम या घोषणा संसदेत नको. संसदेत कोणत्याच धर्माच्या घोषणा संसदेत देता कामा नये. कोणत्याही घोषणा न देता संसद व्यवस्थित चालू शकते. संसदेचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. असेही ते म्हणाले.