पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) मागील काही दिवसांपासून गौप्यस्फोट आणि दावे-प्रतिदावे करण्याची मालिकाच सुरु झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 15 दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, 15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि एक नसून दोन बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शिवसेनेबरोबर (Shivsena) वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरु असून आमच्या युतीची काळजी करु नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, पुलवामा बाबत त्यावेळी मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. तीला प्रोटेक्शन नव्हतं. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होतं. दहा गाड्या कॅनॉव्ह बद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे. ती बाब यांना नसावी. याची साधी चौकशी देखील नाही. राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात सरकारला धोका नाही-अजित पवार
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, अपक्ष धरुन भाजपकडे (BJP) 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि 9 अपक्ष. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामुळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे आहेत. त्यामुळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहिल असे अजित पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar big claim over
हे देखील वाचा :
Ajit Pawar | 16 आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, अजित पवारांनी सांगितलं सत्तेचं गणित