नागपूर बहुजननामा ऑनलाईन – कर्नाटकच्या अलमट्टी धरणात पाणी अडवले जाते. त्यामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर नागपूरमध्ये बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, शासनाने पूरग्रस्तांना कोणतीही मदत पुरविली नाही. एकिकडे पूरस्थिती निर्माण झालेली असताना भाजप आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचारासाठी यात्रा काढत आहेत. असा आरोप त्यांनी केली.
मंत्री पर्यटन करण्यासाठी जातात. ते पूर स्थितीबाबत गंभीर नाहीत. पूरग्रस्तांना ताबडतोब मदत निधी म्हणून खावटी देण्यात येते ती अजूनही लोकांना देण्यात आली नाही. आमदार, मंत्री पूरग्रस्त भागात भेटी देत आहेत. त्यामुळे प्रशासनही त्यांच्या मागे फिरत आहे. परंतु पूरग्रस्तांना मदत मिळत नाही. असा आरोप त्यांनी केला. अडिच लाखांपेक्षा जास्त लोक पूरात अडकले असताना सरकारकडे निवडणूक प्रचारासाठी पैसे आहेत. मात्र दुष्काळग्रस्त भागाला निधी का नाही ? असा सवाल त्यांनी विचारला.