बहुजननामा ऑनलाइन – पंतप्रधान किसान सन्मान निधी( pradhan mantri kisan samman nidhi) योजनेंतर्गत तुम्हाला वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर मग आधार पडताळणीसाठी तयार व्हा. जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत आधार लिंक करावे लागेल.अन्यथा पैसा येणे बंद होईल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही.उर्वरित राज्यांमध्ये १ डिसेंबर २०१९ पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी ( pradhan mantri kisan samman nidhi)योजना धारकांना आधार अनिवार्य करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार सुरुवातीपासूनच आधार कार्डची मागणी करतहोते. पण याबद्दल फारसा दबाव नव्हता. नंतर हे सक्तीचे केले गेले जेणेकरुन केवळ वास्तविक शेतकर्यांनाच लाभ मिळावा. राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी पंतप्रधान-किसान पोर्टलवर अपलोड केलेल्या लाभार्थ्यांच्या आधार डेटाद्वारे केवळ लाभांची यादी सादर केल्या जाते
पंतप्रधान-किसान योजनेत आधार लिंक कसे करावे :
पीएम किसान योजनेत तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जावे लागेल. आधार कार्डाची प्रत तुमच्या बरोबर घ्या. बँक कर्मचार्यांना खात्यास त्यांच्या आधारशी लिंक करण्यास सांगा.आधार कार्ड एक छायाचित्र प्रत आहे आणि खाली त्या ठिकाणी सही करा.
जवळपास सर्व बँकांमध्ये ऑनलाईन आधार लिंकिंग ची सुविधा उपलब्ध आहे. जिथून आपण आधार कार्ड वरील नंबर लिंक करू शकता. जोडणी करताना, १२ अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक टाइप करा आणि सबमिट करा. जेव्हा आपला आधार आपल्या बँक नंबरशी जोडला जाईल, त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर संदेश पाठविला जाईल. परंतु यासाठी तुमच्याकडे नेट बँकिंगची सुविधा असावी.
किती शेतकर्यांना पैसे मिळालेः
कृषी मंत्रालयाच्या जाहीर केलेल्या आकड्यांप्रमाणे आजपर्यंत देशातील सुमारे ११ कोटी शेतकरी कुटुंबांना ९४ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील ११,१३,२३८ शेतकरी कुटुंबांना योजनेचे पैसे प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे मेघालयातील १,७३,२५९ आणि आसाममधील ३१,१७,२०७ शेतकर्यांनी लाभ घेतला आहे.