मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेला आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. भाजपशी फिस्कटल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी चर्चा केली होती. यानंतर शिवसेनेला दोन्ही पक्षांचा पाठिंबा अद्याप मिळालेला नाही.
दरम्यान दोन्ही पक्षांशी चर्चा सुरु आहे आणि त्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागू शकतो असं वक्तव्य युवासनेा प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. राजभवनातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, “आमची सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षाशी चर्चा केली. परंतु अद्याप बोलणी पूर्ण झालेली नाही.
यासाठी दोन दिवसांचा वेळ लागू शकतो. आम्ही राज्यपालांना वेळ वाढवून मागितली होती. परंतु त्यांनी ही वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. असे असले तरी आम्ही सर्वांना घेऊन सोबत जाऊ आणि पुन्हा येऊ” असे म्हटले आहे.
Visit : bahujannama.com