मुंबई बहुजननामा ऑनलाईन – सध्या देशात मॉब लिंचींगचे प्रकार सुरु असून यावर अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि,लिंचींग प्रकरणाला जातीय अथवा धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण केले जाऊ नये असे प्रतिपादन अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. हज हाऊसच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की जमावाकडून ठार मारले जाण्याचा प्रकार हा गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे. त्याचा निषेधच केला पाहिजे. पण त्याचे राजकारण करणे योग्य नाही. काही दिवसांपूर्वी झारखंड मध्ये जयश्रीराम आणि जय हनुमान च्या घोषणा दिल्या नाही म्हणून एका मुस्लिम युवकाला ठार मारण्यात आले. त्या प्रकाराविषयी संसदेतही ओरड झाली. बहुसंख्याक हिंदु समाजातील सहिष्णुता आणि सलोखा हाच भारतीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे.
फाळणीनंतर पाकिस्तान हा इस्लामिक देश बनला पण या देशातील बहुसंख्याक हिंदुंनी सेक्युलर बनण्यालाच प्राधान्य दिले आहे ही बाबही ध्यानात ठेवावी लागेल. या देशातील वैविध्यामुळेच एकता साधली गेली आहे. सर्वसमावेशक संस्कृतीमुळे देशातील ऐक्य आणि सलोखा टिकून राहिला आहे. त्यातून देशाने दहशतवादाचा पराभव केला आहे. दहशतवाद हा मानवतेचा आणि इस्लामचाहीं मोठा शत्रु आहे हे मुस्लिम समाजही ओळखून आहे असेही त्यांनी नमूद केले.