मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- नवीन मोटार वाहन अधिनियम २०१९ लागू झाल्यानंतर पोलिसांच्या चुकीच्या बातम्या समोर येत आहेत. काही पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या कार चालकांना दंड लावला तर आणखी दुसऱ्या काही गडबडी करून ठेवल्या. सर्वात मोठा दंड भरणाऱ्याचे दंड आकरतांना त्याचे नाव चुकीचे लिहिले. दिल्लीच्या रोहिणी कोर्टात राजस्थान येथून एका ट्रकचे १,४१,७०० रुपयांचा दंड आकारला या ट्रकला ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये ओव्हरलोडींग साठी ७० हजार रुपयांचे चालान केले गेले होते. ट्रक मध्ये अतिरिक्त माल भरला गेला असल्यामुळे ट्रक मालकाला सुद्धा ७० हजार रुपयांचे चालान केले गेले होते.
ट्रक मालकाने सांगितल्यानुसार याच्या व्यतिरिक्त आणखी १७,०० रुपयांचे चालान केले गेले होते. चालान ची पूर्ण रक्कम १ लाख ४१ हजार ७०० रुपये झाले आहेत. ९ सप्टेंबर रोजी हरमन राम यांनी चालान ची रक्कम रोहिणी कोर्टात जमा केली आहे. पैसे भरणाऱ्याचे नाव भगवान राम लिहिले गेले आहे. परंतु आरटीओ बिकानेर मधून भेटलेल्या माहितीनुसार ट्रक नोंदणी नंबर RJ07 GD 0237 च्या मालकाचे नाव हरमन राम असे आहे.
नियमांची योग्य माहीती नसल्यामुळे वाहन चालक अडचणीत-
नवीन मोटार वाहन दुरुस्ती कायद्याच्या नियमांची अंमलबजावणी १ सप्टेंबर पासून देशभर लागू झाली आहे. तेव्हा पासुन एकाहून एक नव नवीन प्रकार बाहेर येत आहेत. एखाद्याला २५ हजार दंड आकारला गेल्याची बातमी तर दुसऱ्या एकाला ६० हजार रुपयांचा दंड आणि आता तर दिल्ली मधील रोहिणी कोर्टात एका ट्रक मालकाने १४१७०० रुपये दंड भरला असल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणात दंड जमाकर्त्याचे नाव चुकीचे लिहिले गेले आहे. नवीन नियम लागू होऊन आता १० दिवस झाले आहेत. वाहन चालकांना नवीन नियमांची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत.
नवीन नियमांमुळे भराव्या लागणाऱ्या रकमांचे प्रमाण वाढले-
मुळात प्रश्न असा आहे की, वाहन चालकांना काय करावे आणि काय करू नये हेच समजत नाहीये. वाहतूक पोलीस नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करत आहेत. नवीन मोटार वाहन दुरुस्ती कायद्यांअंतर्गत लायसन्स नसताना गाडी चालवल्यास ५००० रुपयांपर्यंचे चालान लागत आहे. नवीन नियमांनुसार चलनांच्या रकमांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागांमधून मोठ मोठ्या रकमांचे चालान काटले जात आहेत. असाच एका प्रकारात चालान कापले गेल्यामुळे दिल्लीमध्ये एक तरुणाने आपली मोटारसायकल पेटवून दिली होती. नवीन नियमानुसार वाहतुकीचे नियम भंग केल्यास दंडाच्या रकमा अतिशय वाढवल्या गेल्या आहेत. त्याचा सामान्य लोकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये वाहतूकीच्या नवीन नियमांबाबत नाराजी असल्याचे दिसून येत आहे.