बहुजननामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. यासंदर्भाात त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशवासीयांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी देशवासीयांसोबत बोलणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. जगातल्या सगळ्या मानवजातीला करोनाचा त्रास होतो आहे.
हिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा करोनामुळे होतो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यामुळे आता आज ते काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.