नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच विख्यात कायदेपंडित , माजी अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी वयाच्या ६६ वर्षी अखेरचा श्वास घेतला . दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दुपारी १२ वाजता प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान यांनीदेखील माझा अत्यंत जवळचा मित्र गेल्याचे म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना स्पष्ट केल्या , ‘ मी अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे. गेली अनेक वर्षे मी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होतो. त्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील.’
नरेंद्र मोदी यांनी लिहिले कि, ‘जेटली हे सदैव स्मरणात राहतील . लोकशाही वाचविण्यासाठी आणीबाणीच्या काळात त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचा लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले. समाजातील सर्व स्तरांवरून त्यांना प्रेम मिळाले आहे. जेटली हे बहुआयामी होते. त्यांचे सर्व विषयांतील ज्ञान हे असामान्य होते.
Full of life, blessed with wit, a great sense of humour and charisma, Arun Jaitley Ji was admired by people across all sections of society. He was multi-faceted, having impeccable knowledge about India’s Constitution, history, public policy, governance and administration.
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019